Monday, 6 May 2013

लिखाणाचा श्रीगणेशा ...पुन्हा नव्याने..


 



काश्मीर”’ भारताचे नंदनवन म्हणून संबोधतात त्याची प्रचिती यावेळी प्रकर्षाने जाणवली. दरवर्षी काहीतरी ठिकाण नव्याने सुरु करायचे हा पार्थ चा शिरस्ता आम्ही या वेळीही पाळला.
नाही म्हणता म्हणता मला इंजिनियरिंग क्षेत्रामधील नोकरी सोडून ६ वर्ष होऊन गेली यावर विश्वास बसत नव्हता. Paarth Travels ला पण १० वर्ष झाली..त्यामुळे पसारा हा वाढतच होता..त्यात एक पथ्य ठेवले ते म्हणजे जे आवडेल, भावेल तेच करायचे,..इच्छा नसताना, पैसे मिळतात म्हणून काहीही करायचे हे मनाला पटतच नव्हते..
मेहनत करण्याची तयारी, नवीन आव्हाने स्वीकारण्याची इच्छा होती, त्याला कल्पकतेची जोड व स्वतः सहल संचालन करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी... त्यामुळे काम करताना त्रास असा कधी जाणवलाच नाही, उलट प्रत्येक वेळी सगळ्यांचे सहकार्य, मदतीची इच्छा, तळमळ जाणवली आणि आम्ही अधिक जोमाने पुढे जाण्यास निघालो..
यश म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो, व्यक्तीसापेक्ष यशाची व्याख्या बदलते, किती पैसा मिळवलात, किती गाड्या घोडे घेतले यामुळे जर यशाची फुटपट्टी ठरत असेल तर मग सगळेच कठीण होऊन बसेल..
माझ्या मते यश म्हणजे आपण करत असलेल्या कामामध्ये तन-मन-धन अर्पून आपले १००% त्यात ओतणे, त्यानंतर जो निकाल हाती येईल, ज्यामुळे पार्थ बरोबर येणारा पर्यटक समाधानी होईल, ती खरी कामाची पावती..एक चांगला माणूस म्हणून नावलौकिक मिळवायला तपश्चर्या करावी लागते. एखादे काम हाती घेतले असल्यास ते पार पडेपर्यंत उसंत घेता काम नये..
असो आज इतकेच बोलून थांबतो, नव्याने लिहिताना वाहते व्हायला थोडा अवधी लागायचा हे नक्की..


No comments:

Post a Comment