Friday, 10 May 2013

मनाच्या कोपऱ्यातून...

सकाळपासूनच कामाची गडबड चालू झाली होती..स्वतःचे बघू की इतरांचे अशा द्विद्धा मनस्थितीत  होतो,
आवरण्याची गती एका मर्यादेपेक्षा काही वाढवता येणार नाही हेय लक्षत आले., शांतपणे इझी चेयर वर बसलो, जरा मागे टेकून लवंडले ना की आपोआप कशा जमवायच्या याची भट्टी जमते...
खूप गोंधळ उडाला असेल ना तर २ मिनिटे डोळे मिटून मनातल्या मनात कामाची उजळणी केली ना की मग हलके हलके वाटायला लागते..मनातल्या विचारांच्या आंदोलनाला एक दिशा मिळालेली असते, त्यांचे पुढे काम चालू राहते..
तरीसुद्धा काही गोष्टी पुन्हा पुन्हा वादळी वाऱ्यांच्या वेगासारखे येऊन मनातल्या अत: पटलावर येऊन थडकत असतात.त्यांना थोपवून धरण्यासाठी मेंदूची अतिरिक्त क्रयशक्ती नष्ट होते आहे याची मोजदादच नसते..

खरचं मेंदूचा असा गुंता झाला ना मग सगळेच बिनसते, सगळेच जणू बंद पुकारू लागतात, त्यांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारची चढाओढ लागते. पण काही गोष्टीसाठी वेळ नसला तरी तो काढायचा असतो.स्वतःला बाजूला ठेऊन ..मग बघा यातून काय काय साध्य होते, परीक्षा कठीण असते पण आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही..
काही जण याला "आशा " म्हणतात तर काही "वेडेपणा" म्हणतात, एक पुसटशी रेषा ह्या दोघांमधून जाते पण नेहमीच्याला बरोबर कळते..असो
लिहीत बसलो तर वेळ आणि लिखाण यांचा मेळ घालणे जरा कठीण असते ..तेव्हा आज इतकेच पुरे ...

राहुल जोगळेकर ९८१९०४२९५६

Wednesday, 8 May 2013


पार्थ काश्मीर वैष्णोदेवी सहल 
२२ एप्रिल २०१३ ते ०१ मे २०१३



"पार्थ" प्रेमाने आपण "काश्मीर" ला आलात
प्रथम वैष्णोदेवी दर्शनाने तृप्त झालात,
पहलगामच्या हवेने थंड थंड झालात..
बेताब व्ह्यलीफिरताना नंदनवनात आलात..

श्रीनगरच्या मुघल गार्डनमध्ये मुलांसंगे बागडलात,
सोनमर्गच्या बर्फामध्ये स्लेज खेळताना रंगलात,
गुलमर्गच्या गंडोलात बसून शिखरांशी भिडलात,
सावंत, पाटील अन् घाणेकर तुम्ही "पार्थ"शी घट्ट जुड्लात

Tuesday, 7 May 2013

हलके फुलके..पण तरी थोडेसे गूढ...


हलके फुलके..पण तरी थोडेसे गूढ......


सुरुवातीपासून वेगळे वाटावे असे काही नव्हतेच..युगानुयुगे आपली ओळख आहे असे सतत वाटायचे..एकमेकांना जोखणे म्हणतात ना ते याच प्रकारातले.. पार्थ हा यातला एक मजबूत धागा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे..त्याच्या अस्तित्वाने ओघाने पुढे हे सगळे आहेच.,
खरतरं एक अनामिक कुतूहल पण आहे या सगळ्याबरोबर, काय हे सांगणे अवघडच आहे. पटकन सहजरीत्या समजावून सांगणे माझ्यासारख्याला जमणारे नाही.
अजून ओळख संपलेली नाही, अजून शिकतोच आहे,दरवेळी काहीतरी नवीन, गूढ, अंत:करणापासून ते मनाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत, छोट्या छोट्या कप्प्यामधून नाद अजून घुमतोच आहे.,आठवणींचा, वेदनेचा, संवेदनांचा..त्यात दरवेळी काहीतरी भरच पडते आहे..
स्वत्वाची ओळख ही प्रत्येकाला महत्वाची वाटते, त्यासाठी धडपड करणे हे अनिवार्य आहे, खूप उंच डोहात वरून उडी मारणे हे तसे धाडसाचे असते, पण प्रयत्नाची शिकस्त, दुर्दम्य इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, ह्यापुढे आव्हाने फिकी वाटतात..
बस, पुढे जायचे, मनाच्या आनंदासारखे दुसरे काही नाही..हे सगळे करत असताना समाधानाचा आरसा सतत समोर ठेवला की मग त्यात मध्ये मध्ये डोकाऊन बघता येते..आपण आपलीच पाठ थोपटून घ्यायला लाज कसली?
सगळे करत असताना मग किती त्रास, कष्ट, चिंता मध्ये आले तरी त्याचे काही वाटत नाही, शेवटी साध्य करणे हे महत्वाचे..साध्य करताना साथ असेल तर मग सोन्याहून पिवळे, अतीव समाधानाची एक लकेर चेहऱ्यावर नक्की दिसेल अन् त्या समाधानातून हुंकार भरून नवीन क्षितिजे गाठायला सोबतीने पुढे जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगणे..
आज इथेच थांबतो..
तुझाच,
राहुल

Monday, 6 May 2013

लिखाणाचा श्रीगणेशा ...पुन्हा नव्याने..


 



काश्मीर”’ भारताचे नंदनवन म्हणून संबोधतात त्याची प्रचिती यावेळी प्रकर्षाने जाणवली. दरवर्षी काहीतरी ठिकाण नव्याने सुरु करायचे हा पार्थ चा शिरस्ता आम्ही या वेळीही पाळला.
नाही म्हणता म्हणता मला इंजिनियरिंग क्षेत्रामधील नोकरी सोडून ६ वर्ष होऊन गेली यावर विश्वास बसत नव्हता. Paarth Travels ला पण १० वर्ष झाली..त्यामुळे पसारा हा वाढतच होता..त्यात एक पथ्य ठेवले ते म्हणजे जे आवडेल, भावेल तेच करायचे,..इच्छा नसताना, पैसे मिळतात म्हणून काहीही करायचे हे मनाला पटतच नव्हते..
मेहनत करण्याची तयारी, नवीन आव्हाने स्वीकारण्याची इच्छा होती, त्याला कल्पकतेची जोड व स्वतः सहल संचालन करताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी... त्यामुळे काम करताना त्रास असा कधी जाणवलाच नाही, उलट प्रत्येक वेळी सगळ्यांचे सहकार्य, मदतीची इच्छा, तळमळ जाणवली आणि आम्ही अधिक जोमाने पुढे जाण्यास निघालो..
यश म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो, व्यक्तीसापेक्ष यशाची व्याख्या बदलते, किती पैसा मिळवलात, किती गाड्या घोडे घेतले यामुळे जर यशाची फुटपट्टी ठरत असेल तर मग सगळेच कठीण होऊन बसेल..
माझ्या मते यश म्हणजे आपण करत असलेल्या कामामध्ये तन-मन-धन अर्पून आपले १००% त्यात ओतणे, त्यानंतर जो निकाल हाती येईल, ज्यामुळे पार्थ बरोबर येणारा पर्यटक समाधानी होईल, ती खरी कामाची पावती..एक चांगला माणूस म्हणून नावलौकिक मिळवायला तपश्चर्या करावी लागते. एखादे काम हाती घेतले असल्यास ते पार पडेपर्यंत उसंत घेता काम नये..
असो आज इतकेच बोलून थांबतो, नव्याने लिहिताना वाहते व्हायला थोडा अवधी लागायचा हे नक्की..