मनाच्या कोपऱ्यातून...
सकाळपासूनच कामाची गडबड चालू झाली होती..स्वतःचे बघू की इतरांचे अशा द्विद्धा मनस्थितीत होतो,
आवरण्याची गती एका मर्यादेपेक्षा काही वाढवता येणार नाही हेय लक्षत आले., शांतपणे इझी चेयर वर बसलो, जरा मागे टेकून लवंडले ना की आपोआप कशा जमवायच्या याची भट्टी जमते...
खूप गोंधळ उडाला असेल ना तर २ मिनिटे डोळे मिटून मनातल्या मनात कामाची उजळणी केली ना की मग हलके हलके वाटायला लागते..मनातल्या विचारांच्या आंदोलनाला एक दिशा मिळालेली असते, त्यांचे पुढे काम चालू राहते..
तरीसुद्धा काही गोष्टी पुन्हा पुन्हा वादळी वाऱ्यांच्या वेगासारखे येऊन मनातल्या अत: पटलावर येऊन थडकत असतात.त्यांना थोपवून धरण्यासाठी मेंदूची अतिरिक्त क्रयशक्ती नष्ट होते आहे याची मोजदादच नसते..
खरचं मेंदूचा असा गुंता झाला ना मग सगळेच बिनसते, सगळेच जणू बंद पुकारू लागतात, त्यांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारची चढाओढ लागते. पण काही गोष्टीसाठी वेळ नसला तरी तो काढायचा असतो.स्वतःला बाजूला ठेऊन ..मग बघा यातून काय काय साध्य होते, परीक्षा कठीण असते पण आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही..
काही जण याला "आशा " म्हणतात तर काही "वेडेपणा" म्हणतात, एक पुसटशी रेषा ह्या दोघांमधून जाते पण नेहमीच्याला बरोबर कळते..असो
लिहीत बसलो तर वेळ आणि लिखाण यांचा मेळ घालणे जरा कठीण असते ..तेव्हा आज इतकेच पुरे ...
राहुल जोगळेकर ९८१९०४२९५६






